Saturday, February 14, 2009

सावरकरांचा जीवनक्रम

(जन्म-शके १८०५ वैशाख कृ ६ निर्वाण- शके १८८७ फाल्गून शु.६)
१८८३ मे २८ जन्म भगूर गाव(जि। नाशिक)...

१८९२ मातृ निधन...

१८९८ मे देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ...

१८९९ सप्टें ५ पितृनिधन....

१९०० जाने १ मित्रमेळ्याची स्थापना

१९०१ मार्च विवाह

१९०१ डिसे।१९ मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण.

१९०१ जाने।२४ पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात प्रवेश.

१९०४ मे। अभिनव भारत या आंतरराष्ट्रीय क्रांतीसंस्थेची स्थापना.

१९०५ दसरा विदेशी कपडयांची होळी।

१९०५ डिसे।२१ बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.

१९०६ जून ९ लंडनला प्रयाण।

१९०७ मे १० १८५७ च्या स्वातंत्र-युद्धाचा लंडनमध्ये सुवर्ण महोत्सव।

१९०७ जून मॅझिनीचे चरित्र प्रसिद्ध केले।

१९०८ मे २ लंडनमध्ये प्रथम शिवजयंत्युत्सव।

१९०८ हॉलंडमधे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर(इंग्रजी) गुप्तपणे छापले।

१९०९ मे बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण,पण पदवीस नकार।

१९०९ जून वडील बंधु श्री।बाबाराव यांना जन्मठेप-काळेपाणी-शिक्षा.

१९०९ जुलै धिंग्राकृत कर्झन वायलीचा वध।

१९०९ आक्टो।२४ लंडनमधे दसर्‍याचा उत्सव, अध्यक्ष--- बॅ।गांधी.

१९१० मार्च १३ पॅरिसहून लंडनला येताच अटक।

१९१० जुलै ८ मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी।

१९१० डिसे।२४ जन्मठेप काळ्यापाणीची शिक्षा.

१९११ जाने।३१ दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा।

१९११ जुलै ४ अंदमानच्या कारावासास(एकलकोंडीत) प्रारंभ।

१९१९ एप्रिल (बाबारावांच्या पत्नी)सौ।येसुवहिनींचे निधन.

१९२० नोव्हें। धाकचे बंधु डा. नारायणरावांची अंदमान-कारागृहात जाऊन भेट.

१९२१ मे।२ बाबाराव आणि तात्याराव दोघांची अंदमानातून हिंदुस्थानांत पाठवणी.

१९२१ नि १९२२ अलिपूर(बंगाल) नि रत्नागिरी येथील बंदिवास।

१९२३ मुंबईचे राज्यपाल लाईड जार्ज यांची सावरकरांच्या मुक्ततेविषयी चर्चा।

१९२४ जाने।६ राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यात. राहणे या दोन अटींवर येरवडा कारागृहातुन सुटका.

१९२५ जाने।७ कन्या "प्रभात" हिचा जन्म.

१९२६ जाने।१० हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ 'श्रद्धानंद' साप्ताहिक मुंबईत सुरू केले.

१९२७ मार्च १ रत्नागिरीस गांधीजी-सावरकर भेट नि चर्चा।

१९२७ मार्च १७ पुत्र "विश्वास" याचा जन्म।

१९३० नोव्हें १६ रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन

१९३१ फेब्रु।२२ पतित-पावन मंदिरात श्री. लक्ष्मी-नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा.

१९३१ फेब्रु २५ मुंबई इलाखा अस्पृश्यता-निवारक-परिषद अधिवेशन ६ वे अध्यक्ष।

१९३१ एप्रिल २६ सोमवंशी महार-परिषद- अध्यक्ष। पतित-पावन मंदिरात सभा.

१९३१ सप्टें २२ नेपाळ-राजपुत्र हेमसमशेर जंगबहादुर राणा यांनी भेट दिली।

१९३१ सप्टें १७ श्रीगणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन।महाराचा गीतापाठनि ७५ स्पृश्या- स्पृश्य महिलांचे पहिले सहभोजन.

१९३७ मे १० रत्नागिरी स्थलबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता।

१९३७ डिसे।३० हिंदु महासभा १९ व्या अ. भा. अधिवेशनाचे अध्यक्ष,कर्णावती.लागोपाठ सात वर्षे अ.भा.हि.म. सभेच्या अध्यक्षपदीं निवड.

१९३८ एप्रिल १५ 'महाराष्ट्र-साहित्य-संमेलन' २२ वे अधिवेशन,मुंबई, अध्यक्ष।

१९३९ फेब्रु १ निजाम विरोधी 'भागानगरचा निःशस्त्र प्रतिकार' प्रारंभ।

१९४१ जून २२ सुभाषचंद्र बोस अवचित सावरकर-सदनात येऊन भेटले।

१९४१ डिसे।२५ भागलपूरचा नागरिक-सभा-स्वातंत्र्यार्थ लढा.

१९४३ मे २८ ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अ।भा. सत्कार आणि निधी समर्पण.

१९४३ आगस्ट १४ नागपूर-विद्यापीठाने डी। लिट। ही सन्मान्य पदवी दिली.

१९४३ नोव्हें ५ अखिल महाराष्ट्र नाट्य-संमेलन अध्यक्ष।

१९४५ मार्च १६ वडील बंधु श्री।गणेशपंत(तथा बाबाराव) यांचे निधन, सांगली.

१९४५ एप्रिल १९ अ।भा. संस्थान-हिंदूसभा-अधिवेशन(बडोदे) अध्यक्ष.

१९४५ मे ८ कन्या 'प्रभात' चा विवाह, पुणे।

१९४६ एप्रिल मुंबई सरकारनं संपूर्ण सावरकर-वाङमयावरील बंदी उठवली।

१९४७ आगस्ट १५ दुख:मिश्रित आनंद! घरावर भगवा ध्वज नि राष्ट्र- ध्वज उभारले।

१९४८ फेब्रु। ५ गांधी-वधानंतर सुरक्षा-निर्बंधान्वये अटक.

१९४९ फेब्रु १० गांधी-वध अभियोगातून निष्कलंक सुटका।

१९४९ आक्टो १९ धाकटे बंधु डा। नारायणराव यांचे निधन.

१९४९ डिसे। अ.भा.हि.म. सभा, कलकत्ता- अधिवेशनाचे उद्- घाटक.

१९५० एप्रिल ४ पाक पंतप्रधान लियाकत अली ची दिल्ली भेट म्हणून अटक नि बेळगाव कारागृह-वास।

१९५२ मे १०-१२ 'अभिनव-भारत' संस्थेचा सांगता-समारंभ, पुणे।

१९५५ फेब्रु। रत्नागिरीच्या पतित-पावन मंदिराच्या सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष.

१९५६ जुलै २३ लो।टिळक जन्मशताब्दी महोत्सव,पुण्यात भाषण.

१९५६ नोव्हें १० अ।भा.हि.म. सभा,जोधपूर- अधिवेशनाचे उद्-घाटक.

१९५७ मे १० दिल्लीत १८५७ च्या स्वातंत्र्युद्ध-शताब्दी महोत्सवात भाषण।

१९५८ मे २८ ७५ वा वाढदिवस। मुंबई महापालिकेकडून सत्कार.

१९५९ आक्टो ८ पुणे विद्यापीठाने 'डी-लिट' सन्मान्य पदवी(घरी येऊन) दिली।

१९६० डिसें। २४ मृत्युंजय-दिन-साजरा(या दिवशी ५०वर्षे जन्मठेप संपत होती).

१९६१ जाने।१४ मृत्युंजय-दिनानिमित्त शेवटचे प्रकट भाषण(पुणे).

१९६२ एप्रिल १५ मुंबईचे राज्यपाल श्रीप्रकाश घरी येऊन भेटले।

१९६३ मे २९ मांडीचे हाड मोडल्याने रूग्णालयात।( मुंबई)

१९६३ नोव्हें ८ पत्नी सौ। यमुनाबाई यांचे निधन.

१९६४ आगस्ट १ मृत्युपत्र केले।

१९६४ आक्टो। भारत सरकारकडून मासिक रू.३०० मानधन देऊन सन्मान.

१९६५ सप्टें गंभीर आजार।

१९६६ फेब्रु १ अन्न नि औषध वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ।

१९६६ फेब्रु २६ शनिवारी सकाळी १०-३० वाजता देह-विसर्जन। वय८३

१९६६ फेब्रु २७ महायात्रेत मुंबई सेंट्रल स्थानकासमोर रा।स्व. संघाची सैनिकी मानवंदना, मुंबईच्या चंदनवाडी विद्युत्-दाहिनीत अग्निसंस्कार....

संकलन : सुजीत...

2 comments:

  1. आभारी आहे आता हा "सावरकरांचा जीवनक्रम" सर्व लोकाप्रयंत पोहचेल

    ReplyDelete
  2. नमस्कार !!
    १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला उजाळा "स्वातंत्र्यसमर १८५७ चा" http://swatantrasamar1857cha.blogspot.com/,
    त्यात तुम्हाला बघायला मिळेल दुर्मिळ चित्र आणि त्यांची संक्षिप्त माहीती

    तर मग तुम्ही जरुर भेट द्या, आणि तुमचा अभिप्राय ब्लॉग वर द्या !!

    प्रशांत - नाशिक

    कदाचित आपण अजुनही तो उठाव म्हणजे एक बंड होते आणि अपराधी सैनिकांना तशी कठोर शिक्षा देणे योग्यच होते असे मानाल,
    पण आम्ही भारतीय लोक ते केवळ शिपायांचे बंड होते असे मानत नाही, आम्ही ते आमचे पहिले राष्ट्रीय स्वातंत्र्यसमर मानतो.
    --स्वामी विवेकानंद--

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी